एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
Статистикаमी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 20
- Всего постов
- 28
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 71
- 1/48двое суток
- 81
- 1/72трое суток
- 87
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
"आपल्या भारतमातेची गाथा🇮🇳🫡" (नक्की पूर्ण वाचा,स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटासा प्रयत्न✍🇮🇳) नाही मिळाले हो,आपल्या राष्ट्रास हे स्वातंत्र्यचे दिवस सहजासहज.. क्रांतिकारकांच्या शौर्यापुढे अवघे नतमस्तक झाले इंग्रज!🫡 राष्ट्रासाठी,देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लावली प्राणांची बाजी.. असे ते भारतमातेचे शुरपुत्र मरणाला तोंड दयालाही झाले राजी!😢 असा अनेक धर्मांचा,पंथाचा विविधतेत एकता असलेला देश.. आपण सर्व भारतीयच फक्त प्रांतानुसार वेगळे अन्न,भाषा,वेश!🥰 इतिहासाची अनेक साक्ष,शूरवीरांची,विद्वानांची ही भारतभूमी.. जगात,भारतीय सर्व क्षेत्रात पुढे,कुठेही नाही कमी!🔥 अनेकांच्या अथक प्रयत्नांमुळे,शौर्यामुळे आहुतीमुळे मिळाले आज स्वातंत्र्य.. नेहमी असावी ही देशभक्ती,राष्ट्राला मोठे करण्यासाठी सर्वांमध्ये आणखी असावे ऐक्य!🙏🇮🇳 क्रांतिकारकांच्या शौर्याला,तसेच कृषिक🌿,सैनिकांच्या त्यागाला व प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे देशाचे नाव उंचावणाऱ्या सर्वांना धन्यवाद🇮🇳🙏😇Happy independence day🇮🇳🥰जय हिंद🫡🇮🇳 ......🦋🌺✍🙏...... शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Cont-7218160575(what's) Telegram-@Bskendre5 प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
🇮🇳🇮🇳🇮🇳
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत... मित्रांनो, लहानपणी शाळेत आपण ही प्रतिज्ञा अभिमानाने म्हणायचो. भारत माझा देश आहे हे शब्द बोलताना उच्चारताना आपल्या मनात देशाबद्दल प्रेम, आदर आणि अभिमान निर्माण व्हायचा. परंतु आज स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.. आपण खरंच आपल्या देशावर प्रामाणिक आहोत का...?? 👉🏻 बघा, देशभक्ती म्हणजे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकवणे, राष्ट्रगीत म्हणणे किंवा सोशल मीडियावर देशभक्तीचे स्टेटस ठेवणे याला देशभक्ती म्हणत नाही... देशभक्ती आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या कृतींमध्ये दिसली पाहिजे... 👉🏻 आपण नोकरी करतो. व्यवसाय करतो. ऑफिसमध्ये काम करतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा आपण खरंच आपल्या कामाशी इमानदारीने वागतो का..?? कामाच्या वेळेत काम टाळणे, जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे, फसवणूक करणे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे किंवा माझं काय जातंय...??? असा विचार करणे… या सगळ्याचा परिणाम शेवटी आपल्या देशावरच होत असतो... 👉🏻 आपण रस्त्यावर चालतो. हातातला कचरा रस्त्यावर फेकताना आपण एक क्षणही विचार करत नाही. पण त्याच रस्त्यावर घाण दिसली की आपण सरकारला आणि प्रशासनाला दोष देत बसतो...🤷♂️ कचरा रस्त्यावर टाकताना आपल्याला आपला देश का आठवत नाही...?? स्वच्छ भारत फक्त सरकारची जबाबदारी नाही. भारत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. 👉🏻 आपल्या घरासमोर स्वच्छता ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे या छोट्या गोष्टीच खऱ्या देशभक्तीची सुरुवात आहे... आज आपल्या समाजासमोर आणखी एक मोठा प्रश्न आहे जात, धर्म आणि भेदभाव. आपण म्हणतो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग माणूस माणसामध्ये जात-पात, धर्म, भाषा, आर्थिक परिस्थिती यावरून भांडण का करतो...?? 👉🏻 रक्ताचा रंग सगळ्यांचा लाल आहे. दुःख सगळ्यांना होते. आनंद सगळ्यांना होतो. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांच्या भविष्याची आणि चांगल्या आयुष्याची इच्छा असते... मित्रांनो, भारत कोण्या एका जातीचा नाही, कोण्या एका धर्माचा नाही, कोण्या एका भाषेचा नाही. भारत आपल्या सर्वांचा आहे... 👉🏻 आपण एकमेकांना तोडत राहिलो तर देश मजबूत कसा होणार...?? समाजात द्वेष वाढवत राहिलो तर पुढच्या पिढीला आपण कोणता भारत देणार...?? आपल्याला बदलाची सुरुवात दुसऱ्याकडून नको, स्वतःपासून करावी लागेल. 👉🏻 आपण प्रामाणिकपणे काम करूया. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करूया. कचरा करू नका. वाहतुकीचे नियम पाळूया. गरजू व्यक्तीला मदत करूया. मुलांना चांगले संस्कार देऊया. जात-पात आणि धर्माच्या नावावर द्वेष पसरवण्याऐवजी माणुसकीला महत्त्व देऊया... 👉🏻 कारण देश बदलण्यासाठी नेहमी मोठ्या क्रांतीची गरज नसते. कोट्यवधी भारतीयांनी आपल्या रोजच्या आयुष्यात केलेल्या छोट्या-छोट्या चांगल्या कृती एकत्र आल्या, तर देश नक्कीच बदलू शकतो. आपण सरकारकडून चांगल्या भारताची अपेक्षा करतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारूया मी चांगला नागरिक होण्यासाठी आज काय केले..?? जर प्रत्येक भारतीयाने हा प्रश्न स्वतःला रोज विचारला, तर भारत बदलायला वेळ लागणार नाही... तिरंगा फक्त हातात नको… तो आपल्या विचारांमध्ये असायला हवा... 👉🏻 देशभक्ती फक्त घोषणांमध्ये नको… ती आपल्या कृतीत दिसायला हवी आणि भारत माझा देश आहे हे फक्त प्रतिज्ञेतील वाक्य न राहता, आपल्या जीवनाची जबाबदारी बनायला हवी... 🇮🇳 चला, फक्त माझा भारत महान म्हणू नका… आपल्या कृतीतून भारताला महान बनवूया... 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा...🇮🇳🌹 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके ( Coach of Personality Development ) ☎️☎️ 9545441697
без подписи
📚 ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे...💯 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्पर्धा!! स्पर्धा!!! स्पर्धा!!! “आपणास सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की,येत्या १५ऑगस्ट २०२६ ला आपल्या देशाचा स्वतंत्र दिन आहे आणि ह्याच दिवशी आपल्या शब्दगंध समूहाचा वर्धापन दिवस सुद्धा आहे १५ऑगस्ट २०२३ ला आपल्या शब्दगंध समूहाची सुरवात झाली यानिमित्त लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात खालीलप्रमाणे प्रमाणे बक्षीस मिळणार आहे.. प्रथम -१५१ रुपये रोख व शोध सुखाचा पुस्तक.. द्वितीय -१०१ रुपया रोख आणि शोध सुखाचा पुस्तकं तृतीय -५१ रुपये रोख आणि शोध सुखाचा पुस्तक व चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाला प्रोत्साहनपर शोध सुखाचा हे पुस्तकं बक्षीस देण्यात येईल... विषय - १)समाज घडवण्यात लेखकांची भूमिका २)लेखक -समाजाचा शिक्षक ३)प्रगतशिल राष्ट्र घडवण्यात लेखकांची भूमिका... वरील विषयावर किमान ५००ते १००० शब्दात लेख, किंवा निबंध लेखन.. अटी - १)शुद्धलेखनाच्या चुका नसाव्या २)चॅट जिपीटी AI वरील लिखाण अजिबात चालणार नाही.. ३)लिखाण स्वलिखित असावं... ५)स्पर्धा सर्वासाठी मोफत आहे... ६)सर्वांना प्रमाणपत्र मिळेल.. ७)लेख, किंवा निबंध मोबाईल type करुन पाठवायचा आहे पेनाने लिहलेला नाही चालणार.. स्पर्धा दिनांक १५ व १६ ऑगस्ट २०२६ निकाल १८ऑगस्ट नंतर लागेल.. तुमच लिखाण १५व १६ ऑगस्ट ला 8806379959 ह्या व्हाट्सअप नंबरवर किंवा @ABCs1432 ह्या टेलिग्राम ID वर पाठवावे.. वरती स्पर्धेसाठी असा उल्लेख करावा... आयोजक -शब्दगंध साहित्य समूह
कालचा दिवस कसा गेला याचा विचार करत बसण्यापेक्षा, आजचा दिवस कसा सर्वोत्तम बनवता येईल यावर लक्ष केंद्रित करा... कारण गेलेली वेळ कधीच परत येत नाही, पण येणारी वेळ नक्कीच आपल्या हातातील प्रयत्नांवर अवलंबून असते... 🍀🍁🍁🙏🏼🍁🍁🍀 🌞 शुभ सकाळ 🌞
_*कर्माचा न्याय निश्चित आहे नाही तर जो सूर्याला थांबवू शकत होता, तो महाभारत पण थांबवू शकत होता.!*_
नशिबाने दिलेली चांगली माणसं, नेहमी गृहीत धरू नयेत... कारण वेळ निघून गेल्यावर, आठवणी राहतात फक्त,ती माणसं परत येत नाहीत.!💯💫 @rutuja_writes1203
"जगणे ही एक कला आहे आणि ती ज्याला जमली त्याचेच जीवन सार्थक झाले. "जीवन म्हणजे केवळ दिवसांमागून दिवस ढकलणे नव्हे, तर प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे होय. दुःखाच्या सावलीतही सुखाचा कवडसा शोधून, इतरांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवण्यातच जगण्याचे खरे सौंदर्य दडलेले असते." 🌹🌹जय श्री कॄष्ण🌹🌹
*निरागस मन,निष्पाप सोबती आणि खांद्यावर असलेल्या हात यापेक्षा सुंदर काहीच नाही...* *@Prasad❤️*
वजहों के पीछे भागते-भागते, लोग मुस्कुराना भूल जाते हैं। और जो बिना वजह मुस्कुरा लेते हैं, वो ज़िंदगी समझ जाते हैं। @rutuja_writes1203
_*हातातल्या Lines वर कधीच विश्वास ठेवु नका कारण Future तर त्याचं पण असतं ज्यांना हात नसतात.*_
🌹🙏*शब्द हे प्रेम, प्रेरणा, यश आणि नाते आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देत असल्याने शब्दांचे मोल जपले की आयुष्यही अनमोल होते*. 🌺 *सुप्रभात* 🌸... 🌸🙏🌺 Good morning🌷🙏🌸
_*कर्माची लाट जेव्हा उलटते, तेव्हा चांगले चांगले ही बुडतात..!*_
आयुष्य आनंदात जगायचं असेल तर काही गोष्टी बुडबुडे करून हवेत सोडता यायला हव्यात....😊 @Prasad🩷
"🌹🙏 *माणूस काय आहे, हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्विकारावे. आणि जे स्विकारण्यायोग्य नाही, त्यापासून दूर जावे, परंतु स्वत:ला कायम आनंदी ठेवावे.*." 🌸🙏🌺 Good morning🌷🙏🌸 🌸*सुप्रभात*🌸
मला कोणी तरी समजून घ्यावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं मात्र आपण स्वतःला कश्याप्रकारे समजून घेऊ शकतो यावर सर्व काही ठरतं असतं कारण जग आपल्याला आपल्या कृतीवरून त्याचं एक मत तयार करत असतं मात्र आपण जगाकडे कशापद्धतीने बघतो यावर सर्व रहस्य लपलेलं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
फक्त प्रत्येक वळण अनुभवायचं, प्रत्येक क्षण जगायचा, आणि या प्रवासात स्वतःला थोडं अधिक ओळखायचं..!! . . . . @शब्दप्रेमी ❤️🚶🏻 #marathi #marathimotivation #marathicalliography
"🌹🙏 *माणूस काय आहे, हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्विकारावे. आणि जे स्विकारण्यायोग्य नाही, त्यापासून दूर जावे, परंतु स्वत:ला कायम आनंदी ठेवावे.*." 🌸🙏🌺 Good morning🌷🙏🌸 🌸*सुप्रभात*🌸