- Последний пост
- 14 янв.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Новости и СМИ (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
अमेरिका पुन्हा वर्चस्ववाद निर्माण करत आहे का? आपणच जगाचे सुभेदार आहोत, असे अमेरिकेला वाटत आहे का? - श्रीकृष्णा पांचाळ https://www.aksharnama.com/client/article_detail/7602 एका सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखाला त्याच्या देशात अटक करून घेऊन जाणे, हा प्रकार आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय नैतिकता आणि ‘युनो’च्या सनदेला हरताळ फासणारा आहे. यातून युनोचे अपयश, आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन, बहुध्रुवीकरणाला दिलेली बगल, चीन, रशिया, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांनी उभ्या केलेल्या नव्या चळवळीसमोर आव्हान आणि अमेरिकेची दादागिरी अधोरेखित होताना दिसते...
शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले! - श्रीनिवास जोशी https://www.aksharnama.com/client/article_detail/7601 या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा...
सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता… - जगदीश काबरे https://www.aksharnama.com/client/article_detail/7600 इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल?...
‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक - आ. श्री. केतकर https://www.aksharnama.com/client/article_detail/7599 आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो...
‘सम्यक सकारात्मक’ हा माझा दृष्टीकोन राहिला आणि ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ भूमिका घेण्याचा प्रयत्न मी यथाशक्ती केला... - विनोद शिरसाठ https://www.aksharnama.com/client/article_detail/7598 गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ एकाच वेळी होत असेल, तरच ‘विकास’ ही संज्ञा वापरता येईल, अशी भूमिका आम्ही सातत्याने घेत आलो. हा देश एकसंध व एकात्म राहायचा असेल, आधुनिक व सामर्थ्यशाली व्हायचा असेल, तर सर्व घटकांना समान संधी मिळायला हवी, कमजोर घटकांना झुकते माप देतच ते साध्य करता येईल, अशी धारणा कायम राहिली आहे. भारतीय संविधानाच्या मूल्यांशी ते सुसंगत आहे. त्यासाठी खऱ्या राष्ट्रवादाच्या दिशेने जायला हवे...
माझ्या विचारांचा नाही, तो माझा शत्रू, ही धारणा वाढीस लागल्यामुळे विरोधी मत पचवणं जड जाऊ लागलं आहे. सामाजिक ध्रुवीकरणामुळे एकाच देशात दोन किंवा अनेक देश वसू लागले आहेत - सायमन मार्टिन https://www.aksharnama.com/client/article_detail/7597 एकविसाव्या शतकात ज्या राजवटी जगावर अधिराज्य गाजवायची स्वप्नं पाहत आहेत, त्यांचा संकुचितवाद अधिक अतिधोकादायक आहे. सर्वदूर पसरलेली प्रसारमाध्यमं हे तर सत्ता हस्तगत करण्याचं हत्यार झालेलं असून, त्यावरील नियंत्रणामुळे सत्ताधारी आपल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडतात आणि काल्पनिक भीतीचा बागुलबुवा उभा करून लोकांचं लक्ष खऱ्या समस्यांकडून इतरत्र वळवण्यात यशस्वी होतात...
जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे! - विश्वास पाटील https://www.aksharnama.com/client/article_detail/7596 जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता...
जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल - महेंद्र तेरेदेसाई https://www.aksharnama.com/client/article_detail/7595 माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो...
धनंजय चिंचोलीकर नावाचा ‘बब्रुवान रुद्रकंठावार’! - प्रवीण बर्दापूरकर https://www.aksharnama.com/client/article_detail/7594 नीट लक्ष दिलं तर, हा माणूस चारचौघात असला तरी आत्ममग्न असतो. त्याचे डोळे काही तरी टिपत आणि कान काही तरी रेकॉर्ड करत असतात, हे लक्षात यायचं. अर्थात आपण बारकाईनं निरीक्षण करतोय, हे लक्षात आलं तर, धनंजयच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच संकोचत असत. धनंजय चिंचोलीकर याच्यासारखी सूक्ष्म निरीक्षण क्षमता असलेला कुणीही लेखक, पत्रकार आजवर माझ्या पाहण्यात आलेला नाहीये...
विशेष तपास मोहिमेद्वारा (एसआयआर) सुधारणेच्या नावाखाली सध्या जे काही केले जात आहे, त्यामुळे सुधारणांऐवजी विद्रूपीकरणच होत आहे - आ. श्री. केतकर https://www.aksharnama.com/client/article_detail/7593 निवडणूक सुधारणा भाजपच्याच फायद्याच्या कशा होतील, या दृष्टीनेच केल्या जातील, हे स्पष्ट आहे. अलीकडच्या काही राज्यांतील निवडणुकांमध्ये ते स्पष्टपणे दिसून आले आहे. हा काही निव्वळ योगायोग नक्कीच नाही. त्यामुळे निवडणूक आयोग भाजपच्या कह्यात गेला आहे आणि तो जे करतो ते भाजपसाठी, हे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे...
कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे! - रवि आमले https://www.aksharnama.com/client/article_detail/7592 इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेव्हर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या व्हाईट हाऊसमध्ये ‘बॉलरूम’ बांधण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत...! - उज्ज्वला देशपांडे https://www.aksharnama.com/client/article_detail/7591 अमेरिका सध्या गंभीर आर्थिक आणि सामाजिक समस्यांशी झगडत आहे. महागाई आणि भाडेवाढीने सामान्य नागरिकांच्या कुटुंबांवर ताण वाढला आहे. अशा वेळी व्हाईट हाऊसचं रूपांतर एका वैयक्तिक महालात करणं, हे केवळ असंवेदनशील नाही, तर लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना धक्का देणारं आहे. सत्ता जर स्वतःचं प्रतिबिंब सोन्याच्या आरशात पाहू लागली, तर तिला लोकांच्या अंधारात काय घडतंय, हे दिसेनासं होतं...
पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात? - जगदीश काबरे https://www.aksharnama.com/client/article_detail/7590 नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते...
‘सरदार पटेलांची पत्रे’ या लेखमालिकेचा समारोप : सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू - अभय दातार https://www.aksharnama.com/client/article_detail/7589 सरदार पटेलांचे धोरण नेहरूंना साधारणपणे साथ देण्याचे पण प्रसंगपरत्वे वेसण घालण्याचे असे होते, असे म्हणता येईल. हे पाहता नेहरूंऐवजी पटेल पंतप्रधान झाले असते, हा प्रश्न तसा निरर्थक ठरतो. पण ते अधिक काळ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र उरतोच आणि हा प्रश्न रास्त असाच आहे. पण त्याचे उत्तर द्यायचे तर कल्पनेच्या काही भराऱ्या मारणे आले. तशा काही भराऱ्या दहाव्या खंडावरील तिसऱ्या लेखाच्या शेवटाला मारल्या आहेत...
सत्य, अहिंसा आणि प्रेम ही एक त्रिसूत्री आहे, आणि त्याच्या उलट असत्य, हिंसा आणि द्वेष अशीही एक त्रिसूत्री आहे, हे आपल्या लक्षात आणून देतात, असे म.गांधी अधोरेखित करतात! - श्रीनिवास जोशी https://www.aksharnama.com/client/article_detail/7588 म.गांधीजींच्या अनेक संकल्पना लोक समजून घेऊ शकतात, परंतु ‘अहिंसा’ या तत्त्वामुळे गांधीजींबद्दल अनेक गैरसमज पसरले असल्याचे आपण पाहतो. असे गैरसमज पसरण्याचे कारण गांधीजींनीच लेखात दिले आहे. ते लिहितात – “पाशवी शक्तीच्या या युगामध्ये ‘बळी तो कान पिळी’ हा या जगातील अंतिम कायदा आहे. ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात दृढ झालेली असते. त्यामुळे हा कायदा कुणा अहिंसक माणसाला नाकारता येईल, यावर कुणाचा विश्वास बसत नाही.”
‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा - प्रा. अविनाश कोल्हे https://www.aksharnama.com/client/article_detail/7587 जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं...
‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा - प्रियदर्शन भवरे https://www.aksharnama.com/client/article_detail/7586 शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून...
‘भारतीय विरागिनी’ : अखिल भारतीय संतकवयित्रींच्या जीवनगाथा, कथा आणि व्यथा यांची ओळख करून देणारे ‘वजनदार’ पुस्तक - जीवन तळेगावकर https://www.aksharnama.com/client/article_detail/7585 हे पुस्तक अखिल भारतातील संतकवयित्रींविषयी आहे. या संतकवयित्रींच्या रचनांचाही लेखिकेने थोडक्यात परामर्श घेतला आहेच. स्वतः उत्कृष्ट कवयित्री असल्यामुळे लेखिकेने या संतकवयित्रींच्या काही रचनांचा हृदयस्पर्शी भावानुवाद केला आहे. या संतकवयित्रींना मराठी वाचकांसमोर आणण्याचे फार मोठे काम लेखिकेने श्रमपूर्वक केले आहे. या पुस्तकात लेखिकेने एकेक शब्द स्वतःच्या व्यासंगाच्या बळावर तोलून धरला आहे...
‘सेक्युलॅरिझम’च्या तत्त्वास हरताळ फासत हिंदू धर्मीयांस ‘सनातन’मध्ये धर्मांतरित करण्यात येत आहे. खरे तर हिंदू धर्म आज खरोखरच ‘खतरे में’ आहे! - रवि आमले https://www.aksharnama.com/client/article_detail/7584 बिहार सरकारने घेतलेल्या निर्णयाकडे ‘सत्यनारायणा’तून ‘सत्तानारायण’ अशा प्रकारे, केवळ निवडणूक राजकारणाच्या चष्म्यातून पाहणे घातक ठरेल. राज्यघटनेने घातलेले एकेक बंधन मोडणे, त्याच्या परिणामांचा कानोसा घेणे आणि पुढे जाणे, हे तंत्र उजव्या सरकारांनी आत्मसात केलेले आहे. ‘सेक्युलॅरिझम’बाबत तसेच सुरू आहे. खरे तर हे हिंदू धर्मावरील संकट आहे...
“पाटीलबुवा, तुम्हाला धन्यवाद, आम्हाला मूळ पदावर आणले म्हणून!” - जयदेव डोळे https://www.aksharnama.com/client/article_detail/7583 सुंस्कारित असल्यामुळे नाना तसे स्वयंभू आणि सार्वभौम होते. आपण जे कार्य करतो ते थेट ईश्वरी कार्य असल्याचा त्यांचा पक्का समज झालेला होता. तसा तो शाखांमधल्या सर्वांचाच असतो. त्यांना आपण कधीही चुकीचे असू, याची अपराधजाणीव होत नसते. परमेश्वर सतत त्यांच्या ‘सोबत’ असतो. मग चुकीचे असे काय घडणार हातून, असा त्यांचा हेका असतो. शंका, संशय, संभ्रम अथवा दुविधा कधीही त्यांच्या वाट्याला येत नसते...