वास्तव (सत्य की आभास)©®
Статистикаमराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही..... Contact to Admin👉 @Vastav_bot (For Promotion and others)
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 63
- 1/48двое суток
- 72
- 1/72трое суток
- 77
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त तिरंगा लावून फिरणं नाही, तर आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणं.! कारण देश बदलण्यासाठी, प्रत्येकाने सीमेवर जाण्याची गरज नाही आपण जिथे आहोत तिथे थोडं अधिक प्रामाणिक, थोडं अधिक जबाबदार, थोडं अधिक माणूस होणं गरजेचं आहे.!! 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा💐
🪴‼️卐🌸🇮🇳ॐ हं हनुमंते नमः🇮🇳🌸卐‼️🪴 🪴‼️卐🌸जय श्री हनुमान🌸卐‼️🪴
देव कळलेला माणुस गर्दीत नाही, तर एकांतात सापडतो.
अशा मन:स्थितीत त्यांनी पंढरी सोडली असेल, आणि आता ते परतीच्या वाटेने देहूला माघारी येत असतील. पंढरीला असताना जो भजन किर्तनाचा सुखसोहळा वारकऱ्यांनी अनुभवला असेल,त्याविषयीच ते आठवण काढीत असतील व परतीच्या वाटेने चालत असताना त्याच विषयी गप्पागोष्टी आता करत असतील. वारकऱ्यांनी पंढरीला जाताना व पंढरीत गेल्यानंतर ज्या कथा केल्या असतील किंवा ऐकल्या असतील त्या कथेविषयीच त्यांच्या चित्तामध्ये दृढ प्रेम उत्पन्न झाले असेल. पंढरीला जात असताना वारकऱ्यांच्या हातामध्ये गरुड टके, टाळ, मृदुंग, वीणा, पताका यांच्यापासून त्यांना जे सुख झाले आहे, ते सुख ते एकमेकांना सांगत असतील. तुकाराम महाराज म्हणतात, “आता ते वारकरी लवकरच येथे येतील, मग मी त्यांना माझे दोन्ही बाहू पसरुन त्यांना क्षेम आलिंगन देईन.”
आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳 १९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय सैनिकांनी जे अजोड शौर्य गाजवले, त्याचा हा ऐतिहासिक सुवर्णदिन. ⛰️ 'ऑपरेशन विजय' फत्ते करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन. 🙏 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, उणे तापमानात शत्रूचा खात्मा करून कारगिलच्या शिखरांवर तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या त्या प्रत्येक जवानाचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. 🚩 त्यांचे ते सर्वोच्च बलिदान आणि मातृभूमीवरील असीम प्रेम आपण कधीही विसरता कामा नये. आजच्या या मंगलदिनी कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला वंदन! 🙇🏻♂️ भारत माता की जय! वंदे मातरम! 🇮🇳✨
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठूमाऊली च्या दर्शनाचा.. आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा... 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले…🙏🏻 जय जय रामकृष्ण हरी' 🙏🏻🌸 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🙏🏻💐💐
जीवनात मोठं होणं अवघड नाही,पण मोठं मन ठेवणं खूप अवघड असतं.पैसा,पद,प्रसिद्धी आणि यश यामुळे माणूस मोठा दिसू शकतो; पण त्याच्या वागण्यात जर नम्रता,करुणा आणि माणुसकी नसेल,तर त्या मोठेपणाला फारसा अर्थ उरत नाही.खरा माणूस तोच,जो दुसऱ्याच्या दुःखाकडे डोळसपणे पाहतो.मदत नेहमी पैशानेच होत नाही;कधी एखादा दिलासा देणारा शब्द,कधी आधार देणारा हात,तर कधी फक्त शांतपणे ऐकून घेणंही एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतं.आपण जग बदलू शकत नाही,पण आपल्या वागण्याने कोणाचं तरी जग थोडं सुंदर नक्कीच करू शकतो.प्रत्येक दिवस हा स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याची नवी संधी असते.रागापेक्षा संयम,द्वेषापेक्षा प्रेम आणि अहंकारापेक्षा नम्रता निवडली,तर जीवन अधिक अर्थपूर्ण होतं.शेवटी माणूस किती श्रीमंत होता हे लोक विसरतात;पण तो किती चांगला माणूस होता,हे मात्र आयुष्यभर लक्षात ठेवतात.म्हणून संपत्तीपेक्षा माणुसकीची श्रीमंती कमवा.तीच आयुष्यभर साथ देणारी खरी संपत्ती आहे. "मित्रांनो;काळजी घ्या. ..."
एक काळ असा होता, जेव्हा रॉकेट आणि उपग्रह प्रक्षेपणाची जबाबदारी प्रामुख्याने सरकारी संस्थांवर होती. पण आज भारताच्या अंतराळ क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे… 18 जुलै 2026 रोजी भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. हैदराबादस्थित Skyroot Aerospace या भारतीय खासगी अंतराळ कंपनीने आपल्या Vikram-1 Test Flight-1 – “Mission Aagaman” या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे इतिहास रचला. श्रीहरिकोट्यातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (SDSC-SHAR), First Launch Pad (FLP) वरून Vikram-1 ने आकाशाकडे झेप घेतली… ही केवळ एका रॉकेटची चाचणी नव्हती… ही होती भारताच्या खासगी अंतराळ उद्योगाच्या नव्या युगाची सुरुवात! या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते — 450 किलोमीटर उंचीवरील निम्न पृथ्वी कक्षेत (LEO) उपग्रह पोहोचवणे आणि 60° Inclination असलेल्या कक्षेत त्याचे प्रस्थापण करणे. या उड्डाणादरम्यान रॉकेटची इंजिन प्रणाली, मार्गदर्शन, नेव्हिगेशन, उड्डाण नियंत्रण आणि इतर महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंतराळात चाचणी घेण्यात आली. Vikram-1 हे भारतातील खासगी कंपनीने विकसित केलेले महत्त्वाचे कक्षीय प्रक्षेपण वाहन (Orbital Launch Vehicle) आहे. लहान आणि मध्यम आकाराचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी हे रॉकेट विकसित करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कार्बन-कॉम्पोझिट संरचना आणि उच्च कार्यक्षम प्रणोदन प्रणाली यामुळे Vikram-1 भारताच्या भविष्यातील व्यावसायिक अंतराळ प्रक्षेपण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही गोष्ट आजपासून सुरू झालेली नाही… 2018 मध्ये स्थापन झालेल्या Skyroot Aerospace ने 2022 मध्ये Vikram-S या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी उपकक्षीय प्रक्षेपण करून इतिहास घडवला होता. आणि आता… Vikram-1! म्हणजेच, उपकक्षीय उड्डाणापासून थेट कक्षीय प्रक्षेपणाच्या दिशेने एक मोठी झेप! या संपूर्ण प्रवासात ISRO आणि IN-SPACe यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. ISRO कडून तांत्रिक मार्गदर्शन, प्रक्षेपण सुविधा आणि आवश्यक सहकार्य मिळाले, तर IN-SPACe ने भारतातील खासगी अंतराळ कंपन्यांना नियामक आणि प्रोत्साहनात्मक मदत उपलब्ध करून दिली. आजचा हा क्षण केवळ Skyroot Aerospace चा विजय नाही… हा विजय आहे भारताच्या वैज्ञानिकांचा, अभियंत्यांचा, अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सचा आणि प्रत्येक भारतीयाचा! भविष्यात भारतातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे उपग्रह प्रक्षेपित केले जातील. भारत जागतिक व्यावसायिक अंतराळ बाजारपेठेत आणखी मजबूत बनेल. “Make in India” आणि “Atmanirbhar Bharat” या संकल्पनांना अंतराळाच्या अनंत आकाशात नवी उंची मिळेल! आज Vikram-1 ने आकाशात झेप घेतली आहे… पण खरं पाहिलं तर, आज भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राने भविष्याकडे झेप घेतली आहे!
без подписи
वारीच्या या चिखलाचा ही चंदन व्हावा.. आईच्या सेवेसाठी मी पुन्हा पुंडलिक व्हावा..! रामकृष्णहरी
जेंव्हा सूर्य साक्षात विठ्ठलाच दर्शन घेतो.... दिवे घाट.... इंद्रव्रज
विठोबाचे दास व्हायचे असेल तरच मनुष्य जन्मास यावे. नाही तर श्वान म्हणजे कुत्रे आणि डुकरे ही काय थोडी आहेत ? अंगाला त्रिविध गुणांचा (अविद्येचा आणि पापाचा, सत्व-रज-तमाचा) मळ लागू न देणे हेच खरे मनुष्य जन्माचे फळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या विठ्ठलाच्या नावाने जे सज्जन झाले, ते धन्य होत. राम_कृष्ण_हरी
एकनिष्ठ रुख्मिणी भेटायला सुद्धा "विठ्ठलाच नशीब लागतं असत..! रामकृष्ण हरी🙌🚩
गळ्यात तुळशीची माळ, ओठांवर विठ्ठलाचे नाम आणि हृदयात अखंड भक्ती… याहून मोठी श्रीमंती जगात दुसरी कोणती? वारकरी साधेपणाने जगतो, पण श्रद्धेने समृद्ध असतो. याच भक्तीमुळे वारी ही केवळ वारी नसून जीवन जगण्याची शिकवण आहे.🚩 🟠॥ राम कृष्ण हरी ॥🟠 ॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥ वारी विठ्ठल माऊली
चार लोकं काय म्हणतील म्हणणारे, संकटात आणि हॉस्पीटल मध्ये सर्वात आधी गायब होतात.!💯
नात्याच्या भिंतीला चिरा गेल्या की ''आपुलकीने जपलेला वाडा देखील 'वस' पडतो..!🥹
🙏🙏नशिबात जर कष्ट लिहिलं असेल तर.. यश पण पुढच्या वळणार कुठे ना कुठे लिहून ठेवलेलं असेलच की🙏🙏..!
एका कोंबड्याला विचारल गेलं, माणस सुखाने जगू देत नाहीत, कापून खातात. कोंबड्याचे उत्तर - लोकांना जागं करणाऱ्याचे समाजात नेहमी हेच हाल होतात.
कपाळी बुक्का लावूनी, विठ्ठलाच्या भक्तीत हा जीव रंगला... जगातील सारा निखळ आनंद, या एकाच हास्यात जणू साठला... शब्द_मनाचे